शाळेला दिवाळीच्या सुट्या असल्याने गावी गेलो. घरी थोडं थांबून निघालो पाराकडे. गावातल्या घरी आलो की पाराकडे फिरून यायची माझी सवय तशी जुनीच. गावात आपलं सहजच फिरून आलं की कळतंय कोण आलं, कोण गेलं. सोबत आणखी इतर गोष्टीही कळतात. गावातली माणसं आपलीच असली, तरी यानिमित्ताने त्यांच्यासोबत घडणाऱ्या संवादाचे चार शब्द मनास नवी ऊर्जा देऊन जातात. कोणाचं सुख, कोणाचं दुःख, कोणा घरातली लग्नकार्ये, शेतशिवार, गुरंवासरं, देव, धर्म, परंपरा, नवससायास, यात्रा-जत्रा, परिसर काय काय विषय कळत-नकळत कळतात. ओळखीच्या माणसांचे आपलेपणातून प्रकटणारे शब्द भूतकाळ जागा करतात. स्मृतींचे आभाळ सोबत घेत मन पंख पसरून पिंगा घालत राहते. गावात नसतील सगळीच नाती रक्ताची. पण मानलेली, निर्माण केलेली आणि जाणीवपूर्वक जोपासलेली ही नाती आपलेपणाच्या रेशमी धाग्यांची वीण घट्ट करत राहतात. नात्यांचा...
Sakha-Soyara | सखा-सोयरा
गेल्या आठवड्यात गावी गेलो. म्हणजे आवश्यक होतं म्हणून जाणं घडलं. अन्यथा स्वतःभोवती तयार करून घेतलेल्या शहरी सुखांच्या कोशातून बाहेर पडून गावी जाणं कठीणच. कारण मध्यमवर्गीय मानसिकतेने घडत गेलेल्या आत्मकेंद्रित विचारांची झूल मनावर पांघरून घेतली असल्याने, ती उतरवणे अवघड. कोण उगीच चाकोरीत चालणाऱ्या दैनंदिन क्रमात व्यत्यय आणून गावाकडे जातो? पण कधीकधी कामंच अशी काही निघतात की अनिच्छेने का असेना, शहरी सुखांची पांघरलेली घोंगडी काढून आपल्या अस्तित्वाच्या मुळांशी जुळावंच लागतं. अर्थात याचा अर्थ असाही नसतो की, आपल्या मातीच्या ओलाव्याला आपण विसरलेलो असतो. फक्त सुखासीन जगण्याची सवय करून घेतल्याने गावाकडील गैरसोयीत जाऊन राहावंसं वाटत नाही एवढंच. म्हणूनच एखाददोन दिवसाचंही गावी राहणं जीवावर येतं. पण हेही सत्य आहे की, गैरसोयीपासून कितीही लांब राहण्याचा प्रयत्न...
Aswasth Chitre | अस्वस्थ चित्रे

१. सन. २०१५,
सीरियात राहणाऱ्या आयलान कुर्दीच्या मृत्यूने जगभरातील संवेदनशील माणसांची मने गलबलून आली. समुद्रकिनाऱ्यावर निपचित पडलेल्या लहानग्याच्या देहाचं चित्र ज्यांनी पाहिलं, त्या प्रत्येक मनात कालवाकालव झाली. ज्या वयात मुलांनी हसावं, खेळावं त्या वयात मुठभर देह सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला पालकांसोबत विस्थापित व्हावं लागलं. नियतीने पाश घट्ट आवळले. क्षणात होत्याचे नव्हते झाले. जीवनाचं रुजलेलं रोपटं उखडून फेकलं गेलं. सगळ्याबाजूनेच परिस्थितीच बेईमान झाली. स्वकीयांच्या सहवासाचे सगळे पाश सोडून...
Shodh | शोध
माणूस इहलोकी जन्माला येतो तो नियतीने दिलेलं गाठोडं सोबत घेऊन. नियतीने रेखांकित केलेल्या जीवनरेषेवरून त्याचा जगण्याचा प्रवास घडत असतो. ही रेषा सरळसोट असेलंच असे नाही. बऱ्याचदा ती वेगवेगळी वळणं घेऊन पुढे सरकत असते. माणसं चालत राहतात परिस्थितीने नेमलेल्या मार्गावरून काहीतरी शोधत. जे त्याला खुणावत असते आपल्याकडे येण्यासाठी. त्यातून लागते हाती काही, काही निसटते. सुटले ते मिळवण्याकरिता सुरु होतो पुन्हा शोध. माणसं धडपड, धावाधाव करीत राहतात. ज्याचा शोध घेत होते ते हाती लागल्याने सुखावतात. शोधूनही हवं ते न मिळाल्याने निराश होतात. मार्ग अवरुद्ध होत जातात. आलेल्या अपयशाशी दोन हात करीत उभं राहण्याची उमेद अशी सहज टाकता नाही येत, म्हणून परिस्थितीशी धडका देत राहतात. प्रश्नांचा गुंता वाढत जातो. त्यांचे पीळ सैल करीत, गाठी-निरगाठी सोडत माणसांची शोधयात्रा...
Vaat | वाट
काही लाख वर्षापूर्वी कुठल्याशा भूप्रदेशावर जगण्याच्या स्वाभाविक गरजपूर्तीसाठी चालते झालेले माणसाचे एक पाऊल इहतलावरील वाटांच्या निर्मितीचे कारण ठरले. वाटेचे वयही माणसांच्या धरतीवरील वास्तव्याइतकेच. नियतीने निर्धारित केलेल्या मार्गाने निघणाऱ्या माणसांच्या पावलांनी केलेल्या प्रवासाचा प्रारंभ वाटांच्या निर्मितीचे कारण आहे. वाटा माणसाच्या जगण्याला निर्णायक दिशा देण्याचे कारण ठरल्या. नजरेत साठलेल्या क्षितिजांपर्यंत पोहचण्यासाठी पायाखालच्या जमिनीच्या तुकड्याने दाखवलेल्या दिशेने माणसे मार्गस्थ झाली. चालत्या पावलांना घडणारी वाटांची सोबत केवळ नव्या प्रदेशात नेणारा रस्ता नसतात, तर मनात उदित होणाऱ्या आकांक्षांना मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचवण्याच्या माध्यम असतात. खरंतर वाट हा एक लहानसाच शब्द, पण अर्थाच्या अनेक आयामांना सोबत करणारा. मनोविश्वात साकारणाऱ्या...
Aathavaninchya Hindolyavar | आठवणींच्या हिंदोळ्यावर
रविवारची निवांत पावसाळी दुपार. पुस्तकाचं वाचन सुरु. बाहेर पावसाची हलकीशी रिमझिम. वातावरणात एक प्रसन्न गारवा. वाचनाची ब्रह्मानंदी टाळी लागलेली. मन पुस्तकातील मजकुरात गुंफलेलं. मोबाईलची रिंग वाजली. पुस्तकावरून लक्ष विचलित झालं. मोबाईलच्या स्क्रीनवर फक्त क्रमांक दिसतोय. नंबर सेव्ह नसल्याने काही अंदाज येणं शक्य नव्हतं. थोड्याशा नाराजीने कॉल रीसिव्ह केला. पलीकडून आवाज, ‘चंद्या, आहेस कोणत्या जगात? तुझ्या अस्तित्वाचे काही पुरावे आहेत का कुठे शिल्लक?’ क्षणाभराचीही उसंत न घेता समोरचा आवाज बरसत होता. त्या विधानांनी थोडा सरकलोच; पण तसे शब्दातून जाणवू न देता म्हणालो, ‘अरे, कोण तू? आणि असा सुसाट काय सुटतोयेस? जरा श्वास घे! आधी मला सांग, कोण बोलातोयेस?’ पलीकडून पुन्हा रिमझिम सुरु, ‘अरे बेशरम माणसा, माणसांना एवढ्या सहज विसरण्याची कला कधी अवगत केलीस रे?...
Sanvedanshilata | संवेदनशीलता
प्रेमास विरोध केला म्हणून मुलीने आईच्या डोक्यात मुसळ घालून हत्या केली. महाविद्यालयात शिकत असणाऱ्या बहिणीने तंग कपडे परिधान केले म्हणून भावाने मारहाण करून बहिणीचा जीव घेतला. काही दिवसापूर्वीच्या वर्तमानपत्रातील या बातम्या. यातील एक घटना जळगाव जिल्ह्यातील दुसरी कोल्हापूरकडील. राज्याच्या दोन दिशांना घडलेल्या. ‘रोज मरे त्यास कोण रडे’ म्हणून वाचून काही विसरलेही असतील. काही क्षणभर अवाक झाले असतील. काहींनी या घटनांचं विश्लेषण केलं असेल. समाज नैतिक जाणिवा विसरून संवेदनाहीन होत चाललायं म्हणून व्यवस्थेला दोष दिला असेल. काहींच्या मनात प्रश्न निर्माण झाले असतील. कोणी काहीच का करू शकत नाही म्हणून कदाचित काहीजण अस्वस्थही झाले असतील. असं काही घडल्यावर समाज क्षणभर अस्वस्थ होतो, हळहळतो आणि ‘आलिया भोगाशी’ म्हणीत मुकाट्याने नियतीने नेमून दिलेल्या मार्गाने...